HELLO SOLAPUR | सोलापूर जिल्ह्यातील मोहोळच्या दोन पाटलांमधील धुसफूस पुन्हा एकदा उफाळून आली आहे. नुकतेच अजित पवार गटाचे माजी आमदार आणि राज्यमंत्री दर्जा असलेले सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर मात्र आता त्यांच्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी राजन पाटलांना खुले आव्हान दिले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पक्षाचे माजी आमदार आणि सहकार परिषदेचे विद्यमान अध्यक्ष राजन पाटील यांना थेट खुलं आव्हान देत राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.
“जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो, तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात लढा. जर माझा पराभव झाला, तर मी माझं राजकारण सोडून देईन,” असे दमदार वक्तव्य करत उमेश पाटलांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली.
यावेळी राजन पाटलांच्या गावात गेल्यावर माझ्यावर हल्ला केल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी केला आहे. “मी राजन पाटलांच्या गावात गेलो असताना माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु मी शांतता राखली व हिंसक मार्ग न स्वीकारता लोकशाही मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेतला.
यावेळी त्यांनी खोचक टीका करत “अपने गली मे कुत्ता भी शेर होता है.” आमच्यात हिम्मत आहे म्हणून आम्ही लढतो. “माझा बाप ना आमदार, ना खासदार, ना मंत्री. माझ्याकडे पैसा किंवा कारखाना नाही, पण आमच्यात हिम्मत आहे.
पुढे म्हणाले “जर राजन पाटील हे ‘पर्मनंट आमदार’ म्हणवत असतील, तर त्यांच्यात हिम्मत असेल तर माझ्याविरोधात लढून दाखवा.
मोहोळ तालुका दहशतमुक्त व स्वतंत्र करण्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. “आम्ही शहीद होण्याची भीती बाळगत नाही. हा लढा लोकशाही मार्गानेच लढला जाईल, असा पुनःरूच्चार केला.
माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला पण लक्षात ठेवा तुम्हाला पण नरखेड, मोहोळ मध्ये यायचे आहे. कोण कोणाला कमी नसते. तुम्ही फक्त बारावाड्यांचं पाणी पिला आहात, उमेश पाटील बाराशे गावांचे पाणी पिऊन आलाय हे लक्षात ठेवा.
त्यामुळे 4 वर्षाच्या कालावधीत तुमचं 50 वर्षाचं साम्राज्य उध्वस्त करू शकला हे लक्षात ठेवा असंही उमेश पाटील म्हणाले.
नुकतेच राजन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती मा त्यामुळे ते भाजपत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
त्या पार्श्वभूमीवर उमेश पाटलांचे हे विधान अधिकच चर्चेचा विषय ठरले आहे. या घडामोडींमुळे मोहोळ आणि सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.











