HELLO SOLAPUR | पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आत्तापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज जाहीर केलं आहे. मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मदत जाहीर केली आहे.
– राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये खरवडून गेलेल्या जमिनींसाठी राज्य सरकारकडून 47000 तर मनरेगामधून 3 लाख रुपये प्रति हेक्टरी मदत मिळणार.
– त्याचबरोबर कोरडवाहू शेतकऱ्यांना 18 हजार 500 रुपये हेक्टरी तर हंगामी बागायतीला हेक्टरी 27 हजार रुपये मदत मिळणार आहे.
त्याचबरोबर तर बागायतीला 32,500 रुपये तसेच विहिरीत गाळ गेलेल्यांना 30 हजार रुपये मदत मिळणार
राज्यातील पूरग्रस्त भागातील इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 10 हजार कोटींची मदत देणार आहे.
यामध्ये महत्वाचे म्हणजे 253 तालुक्यात सरसकट मदत करणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी 17 हजार रुपये पिक विमा मिळणार आहे.
याशिवाय प्रति कोंबडी 100 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.










