Saturday, February 28, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

स्व. गोपीनाथ मुंडे यांचा वैद्यनाथ कारखाना 104 एकर जमिनीसह 129 कोटीला विकला

Hello Solapur by Hello Solapur
12-Oct-2025 22:56 pm
in महाराष्ट्र
0
0
SHARES
119
VIEWS

HELLO SOLAPUR | [सुरेश जाधव, बीड ] सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा..ऊसतोड मजुरांचा नेता ..तोच पुढे कारखानदाराचाही नेता होतो.. राज्यातील एक दोन नव्हे तर 35 साखर कारखान्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची क्षमता.. महाराष्ट्र सह कर्नाटक ,तेलंगणा मध्य प्रदेश मधील कारखानदारां मध्ये प्रभावशाली वजन असलेल्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना खाजगी कंपनीला विकावा लागला.. याची किंमत फक्त 129 कोटी.? खरच साहेब सहकाराचा गड गेलाय..

गोदावरी , सिंदफनेच्या पाण्याचे अमृतदान मिळालेल्या परळी, माजलगाव, धारूर, वडवणी, धारूर,आंबेजोगाई ,या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी घेऊन येणाऱ्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निर्मितीचा इतिहासही संघर्ष मय आहे. 1996 साली स्थापन झालेल्या सहकारातून समृद्धीचा कानमंत्र देणाऱ्या यात साखर कारखान्याचे अवघ्या 29 वर्षांमध्ये ही अवस्था व्हावी.. याला जबाबदार कोण? आजही पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक दशकाचे सहकाराचे धरोवर नुसते उभे नाहीत तर शेकडो हाताना रोजगार देऊन समृद्धीचे चक्र गतिमान करत आहेत..

पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या ही वाट्याला पित्याच्या अकाली निधनाचे डोंगराएवढ दुखः सहन कराव लागलं. दूरदृष्टीने साहेबांनी जोडलेला समाज, साहेबांची निर्माण केलेली सहकार, उद्योग, व्यवसायातील गड किल्ले त्यांच्या तटबंदी ही मजबूत होत्या.. एवढेच नाही तर राजकारणातील कव्हर फायर देणारे अनेक दिग्गज साहेबांनी उभे केलेले होते. ते पंकजाताईंच्या सोबतीला होते. मुंडे साहेबांनी संघर्ष करून 2014 मध्ये देशातील भाजपचे सरकार आणण्यामध्ये ही मोलाचा वाटा होता. दुर्दैवाने आलेल्या सत्तेची फळे साहेबांना चाखता आली नाहीत.. त्यांच्याच परिश्रमाचे फळ म्हणून राज्यातही सत्ता परिवर्तन झाले केंद्राबरोबर राज्यातही भाजपची एक हाती सत्ता आली. साहेबांनी केलेल्या संघर्षाची फळे पुढच्या पिढीला परिणामी वारसदारांना मिळाली.. याच काळात भाजपमधील मातब्बर कुटुंबाचे वारसदार म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे राज्याच्या सत्ताकारणातील महत्त्वाची मंत्री पदे मिळाली. तुमचे नेते मोदी आणि शहा, नड्डा आहेत. असं निक्षून सांगताना त्यासाठी खरच संघर्ष करावा लागला का? कदाचित तो कुठल्या पातळीवरचा होता.. हे सर्वश्रुत आहे.

पाच वर्ष राज्यातील मातब्बर मंत्री बीडचे पालकमंत्री असताना जिल्ह्यात विकास निधी मोठ्या प्रमाणात आणला याबद्दल कुणाचाही दुमत नाही. याचवेळी साखर कारखाना सुरू होता. मात्र काळानुरूप बदल (मॉडिफिकेशन) फायदा तोट्याचे गणित, कारखान्यावरील कर्जरोखे, बँकांच्या वाढणाऱ्या कर्जाचा आकडा, संचालक मंडळ, कारखानाची व्यवस्थापक, कर्मचारी, ऊस वाहतूकदार मुकादम, या सर्वांशी चर्चा करून तोडगा काढता आला आला नसता का? नेमका कारखाना कर्जामध्ये बुडण्याचे कारण काय? गाळप कमी आणि खर्च जास्त, शेतकऱ्यांना भाव जास्त दिला होता का? जीएसटी चे पैसे थकीत का राहिले? ऊस वाहतूक आणि मुकादम यांचे थकीत बिले का आहेत, एफ आर पी ची रक्कम अद्यापही कारखान्याकडे का शिल्लक आहे. सभासद शेतकऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाही का, एक नव्हे तर अनेक प्रश्न उपस्थित होतात. सत्तेचा राजकारणामध्ये सक्रिय असताना कारखान्याला सहकारातून आजारी उद्योग म्हणून अर्थसाह्य का मिळाले नाही? अशी अनेक प्रश्न आहेत त्याचे उत्तर पंकजाताई यांना द्यावे लागतील..

स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर मुंडे कुटुंबातील बहिण भावाचा संघर्ष राज्याने पाहिला होता. कारखान्यावरून अनेक वेळा धनंजय मुंडे यांनीही टीका टिपणी केली होती. आरोप प्रत्यारोप ही झाले. मात्र त्यानंतर बहिण भाऊ एकत्रित आल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल ही मुंडे समर्थक आणि सामान्य लोकांची इच्छा होते. परळी मधील सत्ता संघर्षाचा विराम झाला होता वाटाघाटीचा आणि परस्परांना पूरक राजकारण सुरू झालं. अशातच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक वाटाघाटीने बिनविरोध झाली. यात दोन्ही बहिण भावाचे मर्जीतील संचालक ही नियुक्त झाले. कर्जाचा डोंगर मोठा झाल्यामुळे कारखाना शेतकरी सभासद संचालक या सर्वांच्या हिताच्या दृष्टिकोनातून देण्याचा निर्णय संचालक मंडळ आणि अध्यक्ष म्हणून पंकजाताई तुम्ही घेतला होता. लोकांना असं वाटलं होतं काही वर्ष हा कारखाना भाड्याने दिला तर कर्ज फिटेल आणि कारखाना परत साहेबांच्या लेकीला मिळेल.. पण असं न होता अवघ्या एक वर्षात हा कारखाना विकल्याची बातमी समजणे हे दुर्दैवी आहे.

लोक प्रेमाने श्रद्धेपोटी मुंडे साहेबांची संघर्ष कन्या.. असा उल्लेख करतात.. राजकारण सत्ताकारनाथ सत्ता येथे जाते.. मात्र सहकार क्षेत्रातील स्वतःच्या वडिलांनी घाम गाळून रक्ताचे पाणी करून उभा केलेले साम्राज्य अशा पद्धतीने त्याची विल्हेवाट लावणं योग्य नव्हे.. जीएसटीने कारखान्यावर कारवाई केली असे समजतात महाराष्ट्रातून मुंडे समर्थक आणि सामान्य लोकांनी मदतीचा ओघ दिला होता त्याची रक्कम 19 कोटी पेक्षा जास्त होती.. तुम्ही आणखी एकदा हाक दिली असती तर कदाचित कारखाना जेवढ्या किमतीला विकला तेवढी किंमत यात मुंडे समर्थकांनी मुंडे साहेबांच्या प्रेमापोटी दिली हे असती.

सुरुवातीला तुम्ही एकट्या होतात. आता तुमचा भाऊ तुमच्या सोबतीला आहे.. डीएम सोबतीला हवा.. या गाण्याप्रमाणे आज तुमच्या सोबत आहेत.. दोघांनी ठरवलं असतं तर कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देता आलं असतं. धनंजय मुंडे यांनी व्यंकटेश्वरा कंपनीच्या माध्यमातून आंबा सहकार साखर कारखाना चालवला नुसता चालवला नाही तर फायद्याचं गणितही जुळवलं.. दुसरे कारखाने चालवून फायद्यात आणता येतात तर मग नेमकं वैद्यनाथच गणित बिघडलं कुठं जे दोघांनाही सोडवता आलं नाही..

कारखान्याची 104 हेक्टर जमीन ज्यामध्ये स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेब यांचे स्मारकही याच कारखान्याच्या लागत आहे. एवढेच नाही तर स्मारकातून साहेब कारखानाकडे त्यांना काय वाटलं असेल याचा विचार केला नाही का?

स्वकर्तृत्वाने देशाच्या राजकारणात स्वयंप्रतिनिधीचा ठसा उमटवणारे स्वबळावर सत्ता परिवर्तन करण्याचे धमक ठेवणाऱ्या नेत्याच्या मार्गदर्शनाने अनेक मातब्बर राजकारणी घडले.. अनेक राजे महाराजे अडचणीच्या वेळी सल्ल्यासाठी रांगेत उभे राहायचे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी अनेक जण तुमच्या पाठीशी उभे राहिले नसते का? ऊसतोड कामगाराच्या आवाजामध्ये पवारांच्या जबड्यातून कामगाराच्या हित जोपासत असताना अनेकांवर साहेबांचे उपकार आणि त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी लोक तयार आहेत पण ते तुमच्याकडे का येत नाहीत.. याचा आत्मपरीक्षण करणे खरच गरजेचे नाही का?

साहेबांनी जोडलेले जिवाभावाचे अठरापगड जाती धर्मातील माणसं आज कुठे आहेत. त्यांचा मानसन्मान हट्ट, हे वे दावे, रुसवा फुगवा गरजा, सुखदुःख, आनंद, या आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांची साथ त्यांच्याशी संवाद सुसंवाद ठेवला आहे का आणि तो आजही आहे का? मान्य आहे तुम्ही सरळ राजकारणी आहात पण जर सरळ राजकारण करत असताना वारशांने मिळालेलं त्याचा बेरजेचं गणित. नव्हता आज वजाबाकी होत आहे.. मग सहकार,उद्योग, राजकारण, पक्षीय राजकारण,जिल्हातील सत्ता कारण, मतदार संघातील वर्चस्व,या सर्वच पातळीवर वजाबाकी का होतेय याच एकदा सिंहावलोकण केले तर वेळ अजूनही गेलेले नाही..

घेतलेला निर्णय याचे परिणाम चुकीचे होत असतील तर निर्णय घेताना, मार्गदर्शन करणारे आणि निर्णय प्रक्रियेतील यंत्रणेतील जवळचे फिल्टर झाले तर परिणामाचे गणित बदलू शकते..

शेवटी ताई तुमचं नाव संघर्ष कन्या आहे. इतर ठिकाणच्या संघर्षापेक्षाही वैद्यनाथ साठीचा संघर्ष करून पुन्हा साहेबांचा श्वास, शेतकऱ्यांची समृद्धी , स्वाभिमान वैद्यनाथ पूर्ववत सहकारी तत्त्वावर गतवैभव प्राप्त करून देता आले तर बघा..!

लेखक : सुरेश जाधव, बीड 9404204008

Tags: BjpBreaking newsGopinath Mundehello solapurMaharashtra PoliticsMarathi newspankaja mundeVaidyanath Shugar Factory Parali beed
Previous Post

सोलापूर – पूरग्रस्तांसाठी सरकारची नेमकी मदत किती मिळणार ते सविस्तर वाचा

Next Post

ब्रेकिंग : गोपीचंद पडळकरांच्या ‘त्या’ विधानावर भाजपच्या प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन; 7 वेळा खासदार ते नेत्रदिपक कामगिरी

December 12, 2025

सोलापूरच्या झोपडपट्टीतून थेट शिवसेनेच्या स्टार प्रचारक!, संघर्ष कन्येची स्फूर्तीदायक यशोगाथा

November 20, 2025

भाजप प्रवेशानंतर कोठे समर्थकांनी घेतला मुख्यमंत्री फडणवीसांचा आशीर्वाद; महेश कोठेंच्या आठवणींना दिला उजाळा

November 12, 2025

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर; असा आहे कार्यक्रम

November 4, 2025

राज्यातील झेड.पी, महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुका आज जाहीर होणार

November 4, 2025
Next Post

ब्रेकिंग : गोपीचंद पडळकरांच्या 'त्या' विधानावर भाजपच्या प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share