HELLO SOLAPUR | आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी आज पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके यांच्यावर गंभीर आरोप करत कडाडून टीका केली.
त्याचबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीवर प्रश्न उपस्थित केले. त्याच्याबरोबर पंकजा मुंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागण्याची मागणी केली. यावेळी ओबीसी, शेतकरी आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली.
– भुजबळ – मुंडे यांच्यावर टीका :
भुजबळ आणि धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद गेल्यावरच त्यांना ओबीसी समाज आठवतो. मंत्रीपदावर असताना दोघांनीही कधी ओबीसींच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. आता सत्तेबाहेर गेल्यावरच समाजाच्या नावाने राजकारण सुरू केल्याचा आरोप. हे सर्व फक्त स्वार्थासाठी केलेले नाटक आहे.
– पंकजा मुंडे वादग्रस्त वक्तव्य :
दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याचा खरात यांनी निषेध केला. पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, “पुरामुळे एका बौद्ध कुटुंबाच्या घरात पाणी गेले आणि वंजारी समाजाने मदत केली.” त्यावर खरात यांनी टीका केली, उपकार हा शब्द जातीवादी वर्चस्व दाखवणारा आहे. बौद्ध समाज नेहमी वंजारी समाजासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहिला आहे. असे बोलून समाजात फूट पाडली जाते. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी तत्काळ माफी मागावी.
– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदत प्रकरण :
शेतकरी मदतीच्या संदर्भात खरात यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. शेतकरी रडत असताना तुम्ही स्वतःचा फोटो लावलेले कीट वाटता, ही जाहिरातबाजी आहे. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी. शेतकऱ्यांचे सरकार आहे असे म्हणताय, तर पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकरी 50 हजार मदत द्या.
– SC वर्गीकरणावर आक्षेप :
सरकारने अ, ब, क, ड आरक्षण वर्गीकरणाचा विचार मांडल्यावर खरात यांनी तीव्र विरोध दर्शवला. “हे आरक्षण संपूर्ण समाजाला दिले आहे, एका जातीला नाही.” लोकसंख्येनुसार वर्गीकरण करावे, अन्यथा समाजात फूट पडेल. आरक्षण केवळ शिक्षण-नोकरीपुरतेच नव्हे तर राजकारणातही लागू झाले पाहिजे.
– लक्ष्मण हाके यांच्यावर हल्लाबोल :
खरात यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर गंभीर आरोप केले. “लक्ष्मण हाके आरोपी वाल्मिक कराडची बाजू घेत आहेत, हे लाजिरवाणे आहे. हाके यांच्या पोटात मनुस्मृती आहे आणि तोंडात फुले-शाहू-आंबेडकर नाव आहे.”
– छगन भुजबळ यांना लक्ष्य :
“छगन भुजबळ हे ओबीसी चळवळीचे नेते नाहीत. मंडल आयोगाच्या काळात त्यांचे कोणतेही योगदान नव्हते. १९९२ मध्ये त्यांनी समता परिषद स्थापन केली पण ओबीसी आंदोलनाशी संबंध नव्हता.
– गोपीचंद पडळकरांवर आरोप :
गोपीचंद पडळकर मंत्रिपद मिळण्यासाठी जयंत पाटील, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत आहेत. भाजप बहुजनांचा वापर करतेय आणि फेकून देते.
गोपीचंद पडळकर तुमच्यापेक्षा माझी भाषा खालची आहे. मी ती बोलू शकतो पाणी मी बोलत नाही. गोपीचंद पडळकर वाईट बोलूनही त्याना साथ मिळते. पडळकरांना आमदारकी मिळाली धनगर समाजाला काय मिळाले?
– 1802 साली हडपसर येथे पेशवाविरुद्ध होळकर लढाई झाली. त्यावेळी पेशवा पळून गेला आणि वसईचा तह केला. हे का नाही सांगत तुम्ही. पेशवे आणि इंग्रजी एकत्र लढले आणि शिंदे, होळकर, भोसले एकत्र लढले.
होळकर घराणे पेशव्याविरोधात लढले आणि गोपीचंद पडळकर तुम्ही पेशव्याजवळ जाऊन त्यांच्या पांघरूनात लपून बसले आहात.











