HELLO SOLAPUR | अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राजन पाटील यांचे अभिनंदन केले. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अखेर अनगर नगरपंचायत बिनविरोध झाली. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिनविरोध निवडणूक निश्चित झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तात्काळ माजी आमदार राजन पाटील यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट देत त्यांचे विशेष अभिनंदन केले.
अनगर नगरपंचायतीत निवडणूक बिनविरोध करण्यामागे राजन पाटील यांचे नेतृत्व, सर्वपक्षीय संवाद आणि स्थानिक पातळीवरील समन्वय महत्त्वाचा ठरल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील यांचेही अभिनंदन :
यासोबतच पालकमंत्री गोरे यांनी नव्याने बिनविरोध निवडून आलेल्या नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील तसेच सर्व नव्या नगरसेवकांचेही मनःपूर्वक अभिनंदन केले.
अनगरच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला :
आज दुपारी अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली.
यामुळे येथील राजकीय प्रक्रिया शांततापूर्ण मार्गाने पूर्ण झाल्याचे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी पात्र असलेल्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे अनगर नगरपंचायत तांत्रिकदृष्ट्या बिनविरोध झाली आहे.
मात्र असं असलं तरी राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवार उज्वला थिटे यांनी न्यायालयात धाव घेतल्याने कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेय. तूर्तास अनगर मधील 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष अखेर बिनविरोध झाले आहे.
नगराध्यक्षपदी प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले होते.
त्यानंतर आज अखेर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आज अर्ज मागे घेतला. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अनगर नगरपरिषद बिनविरोध झालीय. मात्र कोर्ट काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे आहे.











